पर्यटन मंत्रालय

भारत आणि मलेशिया यांनी पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी


2022 या वर्षात 2.5 लाखांहून अधिक मलेशियन पर्यटकांनी भारताला दिली भेट

Posted On: 30 AUG 2024 2:44PM by PIB Mumbai

 

भारत आणि मलेशिया दरम्यान अतिशय घनिष्ठ राजकीय, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंध आहेत. हे संबंध अधिक मजबूत  करण्यासाठी, भारत आणि मलेशिया यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताचे पर्यटन मंत्रालय  आणि मलेशियाचे पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्रालय यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी करार झाला.

20 ऑगस्ट 2024 रोजी भारताचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मलेशियाचे पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री  वाय बी दातो श्री टियोंग किंग सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सामंजस्य कराराची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  • पर्यटन उत्पादने आणि सेवांचा प्रचार आणि विपणन;
  • आदानप्रदान कार्यक्रमांसह पर्यटन संशोधन, प्रशिक्षण आणि विकास क्षेत्रात विस्तार;
  • पर्यटन संबंधी पायाभूत विकास , सुविधा, उत्पादने आणि सेवांमधील गुंतवणुकीला  प्रोत्साहन देणे;
  • वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करणे आणि उत्पादनाच्या प्रचारासाठी हितधारकांना प्रोत्साहित करणे;
  • व्यवसाय पर्यटन, ज्यामध्ये सभा, प्रोत्साहन, परिषदा, प्रदर्शने (MICE) असतील ;
  • पर्यटन हितधारक, टूर ऑपरेटर्स  आणि ट्रॅव्हल एजंट यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देणे;
  • समुदाय-आधारित पर्यटन आणि इको-टुरिझम आणि जबाबदार पर्यटनाचा प्रचार आणि विकास.

मलेशियातून भारतात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात त्यामुळे भारतासाठी ते एक महत्त्वाचे  पर्यटन स्रोत बाजारपेठ आहे. वर्ष 2022 मध्ये, 2.5 लाखांहून अधिक मलेशियन पर्यटकांनी भारताला भेट दिली. या सामंजस्य करारामुळे मलेशियातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या  आणखी वाढेल अशी आशा आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050107) Visitor Counter : 52