पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेशातील सागर येथे भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. मदत केली जाहीर

Posted On: 04 AUG 2024 6:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी या मुलांच्या शोकग्रस्त कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील सागर येथे झालेल्या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना  पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.”

मध्य प्रदेशातील सागर येथे भिंत कोसळून झालेली दुर्घटना हृदय विदारक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या मुलांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. यासोबतच या दुर्घटनेत जखमी झालेले लवकर बरे होतील अशी कामना करतो : पंतप्रधान”

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2041344) Visitor Counter : 35