पंतप्रधान कार्यालय
1.5 लाख वेलनेस सेंटर्सच्या स्थापनेचे उद्दिष्ट गाठल्या बद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
29 DEC 2022 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
1.5 लाख आयुष्मान भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे नव्या भारताला नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की निरोगी नागरिकांमध्ये भारताची समृद्धी वसली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“निरोगी नागरिकांमधेच भारताची समृद्धी वसली आहे. विक्रमी संख्येने उभारण्यात आलेली ही आरोग्य आणि निरामयता केंद्रे या दिशेने मोठी भूमिका बजावतील. हे यश नव्या भारताला नवीन ऊर्जा देईल”.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887425)
अभ्यागत कक्ष : 239
Read this releasein:
Kannada
,
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu