पंतप्रधान कार्यालय

अमेठीतील गौरीगंज परिसरात रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 18 APR 2022 2:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज परिसरात झालेल्या रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

उत्तर प्रदेशात अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज परिसरात झालेली रस्ता दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या प्रती मी तीव्र दुःख व्यक्त करतो. तसेच या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो: पंतप्रधान @narendramodi

 

 

 

 

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817738) Visitor Counter : 151