महिला आणि बालविकास मंत्रालय

मोबाईल आणि इंटरनेट वापराचा मुलांवर होणारा परिणाम

Posted On: 08 DEC 2021 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने  (NCPCR) अलिकडेच  "लहान मुलांकडून इंटरनेट सुविधा असलेले मोबाईल फोन आणि  इतर उपकरणांच्या वापराचे  परिणाम (शारीरिक, वर्तनात्मक आणि मानसिक-सामाजिक)" या विषयावर एक अभ्यास आयोजित केला , ज्यासाठी देशाच्या सर्व  ग्रामीण आणि शहरी भागातील 5000 मुलांची नमुन्यादाखल निवड केली.

या अभ्यासानुसार, 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी बिछान्यात असताना स्मार्ट फोन वापरतात, आणि  वयानुसार हे प्रमाण वाढते; याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. अयोग्य वेळी स्मार्ट फोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर  घातक परिणाम होऊ शकतो. असाच एक परिणाम म्हणजे मुलांमधील एकाग्रतेची पातळी कमी होते.अभ्यासानुसार, 37.15% मुलांना नेहमी किंवा वारंवार, स्मार्ट फोनच्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याचा अनुभव येतो

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारस केली आहे - जमिनीचा एक मोठा भाग मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून राखून ठेवणे  आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांना विविध  खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री  स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779295) Visitor Counter : 227