PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
30 APR 2021 7:34PM by PIB Mumbai
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
देशाची लसीकरणाबाबत उल्लेखनीय प्रगती म्हणजे, लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत 2.45 कोटींहून अधिक नागरिकांनी कोविन (Co-WIN) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. 28 एप्रिल 2021 पासून ही नोंदणी सुरु झाली असून पहिल्या दिवशी 1.37 कोटी लोकांनी तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 एप्रिलला 1.04 कोटींपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती. तर, दुसरीकडे, भारतात आतापर्यंत 15.22 कोटींहून अधिक नागरिकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत, आज सकाळच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 22,43,097 सत्रांमधून 15,22,45,179 लसींच्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. यात, 93,86,904 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि 61,91,118 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,24,19,965 जणांना पहिली मात्रा, तर 67,07,862 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,17,78,842 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 34,17,911 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5,19,01,218 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,04,41,359 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
देशातील दहा राज्यांत एकूण 67.08% लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 21 लाखांहून अधिक लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
आज लसीकरण मोहिमेच्या 104 व्या दिवशी 21,810 सत्रांतून 29 एप्रिल रोजी एकूण 22,24,548 लसींच्या पहिली मात्रा देण्यात आली. तर, 9,49,745 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.
तसेच, गेल्या 24 तासांत, 19 लाखांहून अधिक (19,20,107) कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आजवर एका दिवसातल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.
आतापर्यंत भारतात एकूण 1,53,84,418 कोविड रुग्ण पूर्ण बरे झालेले आहेत. राष्ट्रोय पातळीवरील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 81.99 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 2,97,540 रुग्ण बरे झाले.
दहा राज्यात मिळून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.61% इतके आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 3,86,452 नवे कोरोनारुग्ण
दहा राज्ये—महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली , कर्नाटक, केरळ ,छत्तिसगढ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मिळून एकूण नव्या रूग्णांपैकी 73.05% रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 66,159 रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल, केरळमध्ये 38,607 तर उत्तरप्रदेशात 35,104 नवे रुग्ण आढळले आहेत.
सध्या भारतात 31,70,228 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 16.90% इतके आहे. गेल्या 24 तासात त्यात 85,414 नव्या रुग्णांची भर पडली. एकूण सक्रीय रूग्णांपैकी 78.18% रुग्ण अकरा राज्यांत आहेत. राष्ट्रीय मृत्यूचे प्रमाण सध्या 1.11% इतके आहे.
गेल्या 24 तासात देशभरात कोविडमुळे 3,498 जणांचा मृत्यू झाला.
एकूण मृत्यूंपैकी 77.44% मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (771) मृत्यू झाले तर त्या खालोखाल दिल्लीत 395 जणांचा मृत्यू झाला.
इतर अपडेट्स :
- कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात केंद्र सरकार अग्रस्थानी आहे. महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा लसीकरण हा महत्वाचा स्तंभ आहे. (चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक यांचा या पंच सूत्री धोरणात समावेश आहे.) कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने अनेक ठोस पावले उचलली आहेत.आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार,बकेंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.33 कोटी (16,33,85030) मात्रा मोफत पुरवल्या आहेत.
- कोविड-19 महामारीला प्रतिसाद आणि व्यवस्थापनात केंद्र सरकार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय आणि सहकार्य करत या लढाईचे नेतृत्व करत आहे. कोविड प्रतिबंधन, संसर्ग रोखणे आणि व्यवस्थापनासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. याच मालिकेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सौम्य आणि लक्षणविरहित कोविड-19 रुग्णांसाठी गृह-अलगीकरणासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यामुळे याआधी, म्हणजेच 2 जुलै 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या सूचना रद्दबातल ठरल्या आहेत
- देशात कोविड-19 ची दुसरी लाट सुरू झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी आज मंत्री परिषदेची बैठक झाली. सध्याच्या महामारीने उभे केलेले संकट हे शतकातील अभूतपूर्व संकट असून संपूर्ण जगापुढे त्याने मोठे आव्हान निर्माण केले आहे असे मत मंत्री परिषदेने बैठकीत नोंदवले.
- भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने प्राप्त माहितीचा योग्यप्रकारे अभ्यास करून कोविड-19 ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी - “कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी होम केअर टिप्स” या घरीच काळजी घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांकडून रेमडीसीवर आयात करायला सुरुवात केली आहे. 75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचेल.
- पुणे, खडकी आणि देवळाली येथील 304 खाटांच्या CB रुग्णालयांना आता 'कोविड समर्पित रुग्णालये' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. खडकी, देवळाली, देहूरोड, झाशी आणि अहमदनगर येथील 418 खाटांच्या छावणी सामान्य रुग्णालयांना (CGH) 'कोविड काळजी केंद्र' म्हणून दर्जा देण्यात आला
- संपूर्ण देशभरात सध्या सुरु असलेल्या कोविड संकटाचा सामना करण्यासाठी सशस्त्र दले देशातील विविध नागरी प्रशासनाला मदत करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 29 एप्रिल 2021 रोजी नौदलाच्या पश्चिम कमांडकडून 57 सदस्यीय वैद्यकीय पथक अहमदाबाद येथील पंतप्रधान कोविड केअर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
राज्यात लसीच्या 25-30 लाख मात्रांचा पुरेसा साठा मिळाल्यानंतरच 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु केले जाईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी किमान पाच दिवस पुरेल इतका पुरेसा साठा असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. 18-44 वयोगटातील लोकांसाठी 1 मे पासून संपूर्ण देशभरात लसीकरण सुरू होणार आहे आणि त्यासाठी CoWin अॅपवर नोंदणी सुरू आहे.
FACTCHECK
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715161)
Visitor Counter : 141