कृषी मंत्रालय

राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत (NFSM) धान्यांचे उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवण्यात भारत सरकारचा पुढाकार

Posted On: 15 FEB 2021 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना 2007-08 साली आणण्यात आली. तांदूळ, गहू आणि डाळींखालचे क्षेत्र वाढवून तसेच मृदा सुपीकता व उत्पादनक्षमता वाढवून धान्याचे उत्पन्न वाढवणे, रोजगार संधी निर्माण करणे आणि कृषीधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे अशी उद्दिष्टे या योजनेमागे होती. या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत 2014-15 मध्ये भरड तृणधान्यांचा समावेश करण्यात आला. ही योजना 12 व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सुरू राहिली, त्यात 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी आतिरिक्त 25 दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य होते, ज्यामध्ये तांदूळ उत्पादन 10 दशलक्ष टन, गहू 8 दशलक्ष टन, डाळी 4 दशलक्ष टनआणि भरड तृणधान्याचे उत्पादन 3 दशलक्ष टनांनी वाढवण्याचे लक्ष्य अंतर्भूत होते. 12 व्या योजनेच्या नंतरही ही योजना कार्यान्वित राहिलीत्यात 2017-18 ते 2019-20 या वर्षांमध्ये 5 दशलक्ष टन तांदूळ, 3 दशलक्ष टन गहू, 3 दशलक्ष टन डाळी व 2 दशलक्ष टन पोषक भरड तृणधान्ये असे एकंदरीत 13 दशलक्ष टन धान्य उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य होते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698260) Visitor Counter : 231