शिक्षण मंत्रालय
देशभरातील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ
प्रविष्टि तिथि:
15 FEB 2021 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021
देशभरातील केंद्रीय विद्यालयातील विविध वर्गांमध्ये थेट शिक्षण सुरू झाले आहे. आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार हे ऑफलाईन शिक्षण सुरू झाले आहे. केंद्रीय विद्यालये ऑक्टोबर महिन्यापासून टप्प्याटप्प्याने उघडली जात आहेत.
देशभरातील सर्व केंद्रीय विद्यालयातून 11 फेब्रुवारी 2021 च्या माहितीनुसार नववीच्या वर्गातील सरासरी 42 टक्के, दहावीच्या वर्गातील सरासरी 65 टक्के, अकरावीच्या वर्गातील सरासरी 48 टक्कर तर बारावीच्या वर्गातील सरासरी 67 टक्के विद्यार्थी वर्गात हजर राहात आहेत. ज्या राज्य सरकारांनी खालच्या इयत्तांसाठीही शाळा उघडण्याचा परवानगी दिलेली आहे, त्या ठिकाणी काही केंद्रीय विद्यालयांमध्ये सुद्धा पहिली ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या पूर्वपरवानगीने वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात आहे. कोरोना महामारी लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकारांनी जारी केलेल्या मानक नियमावली पूर्णपणे पाळल्या जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रीय विद्यालयांना विविध वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तासिकांचे नीट नियोजन करण्याच्या तसेच वर्गातून शारीरिक अंतराच्या नियामावलीसह इतरही सुरक्षा नियम व्यवस्थित पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिवाय, जे विद्यार्थी शाळेत हजर राहात नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्गाची सुविधाही सुरू आहे.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1698119)
आगंतुक पटल : 197