रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत शेजारी देशांसोबत सामंजस्य करार करण्यासंबंधी नियम अधिसूचित केले

Posted On: 19 JAN 2021 2:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

 

भारत आणि शेजारील देशांदरम्यान माल आणि प्रवासी वाहतूक सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला मोटर वाहन कायदा, 1988 च्या तरतुदीअंतर्गत नियम अधिसूचित करण्याबाबत विविध क्षेत्रांकडून विनंती केली जात होती.  मंत्रालयाने यापूर्वी अमृतसर ते लाहोर (2006), नवी दिल्ली आणि लाहोर (2000), कलकत्ता आणि ढाका (2000) आणि अमृतसर आणि नानकाना साहिब (2006) दरम्यान बस सेवा उपलब्ध  करण्यासाठी नियम अधिसूचित केले होते. हे नियम  भारत आणि शेजारी देशांदरम्यान स्वाक्षरी क्ररण्यात आलेल्या  सामंजस्य करारांअंतर्गत  जारी करण्यात आले होते.

भारत आणि शेजारी देशांदरम्यान माल आणि प्रवासी वाहतुकीचा समावेश असलेल्या सर्व सामंजस्य करारांच्या सुलभतेसाठी अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी मानक नियम जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात 15 जानेवारी 2021 रोजीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689977) Visitor Counter : 87