पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला


चक्रीवादळातील मृतांच्या कुटुंबियांसाठी अनुदान जाहीर

Posted On: 27 NOV 2020 11:44PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईप्पादी के.पलानीसामी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा प्रकोप व त्यानंतर राज्याच्या काही भागात झालेला जोरदार पाऊस यामुळे ओढवलेल्या परिस्थितीवर  चर्चा केली.  बचाव आणि मदत कार्यासाठी केंद्रीय पथके तामिळनाडूत पाठवण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळात झालेल्या जिवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि जखमींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. पीएमएनआरएफ मधून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 2 लाख रूपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 नुकसानभरपाई दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

PM @narendramodi spoke to Tamil Nadu CM Thiru @EPSTamilNadu and discussed the situation in the wake of the cyclone and heavy rainfall in parts of the state. Central teams are being sent to Tamil Nadu to assist in rescue and relief work. @CMOTamilNadu

— PMO India (@PMOIndia) November 27, 2020

 

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676683) Visitor Counter : 130