रेल्वे मंत्रालय

ऑगस्ट-2020 महिन्यासाठी झपाट्याने काम करत भारतीय रेल्वेने मालवाहतुकीसाठी गेल्यावर्षीच्या याच महिन्यापेक्षा अधिक माल वाहतूक केली


ऑगस्ट-2020 महिन्यात भारतीय रेल्वेत 94.33 दशलक्ष म्हणजे 9.433 कोटी टन माल चढवला गेला, गेल्यावर्षीच्या याच महिन्यापेक्षा हा आकडा 3.31 दशलक्ष टनांनी अधिक

रेल्वे मालवाहतूक अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सूट/ सवलतीदेखील दिल्या जात आहेत

Posted On: 01 SEP 2020 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020 

 

मालवाहतुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी झपाट्याने काम करीत भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडून दाखवला आहे. रेल्वे मालवाहतुकीसाठी मालाची चढाई करण्याचे प्रमाण ऑगस्ट 2020 मध्ये गेल्यावर्षीच्या याच महिन्यापेक्षा वाढले आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय रेल्वेतून वाहतूक करण्यासाठी 94.33 दशलक्ष म्हणजे 9.433 कोटी टन माल चढवला गेला. गेल्यावर्षीच्या याच महिन्यातील याच आकड्याच्या (91.02 दशलक्ष टन) तुलनेत हे प्रमाण 3.31 दशलक्ष टनांनी अधिक आहे.

ऑगस्ट  2020 मध्ये 40.49 दशलक्ष टन कोळसा, 12.46 दशलक्ष टन लोहखनिज, 6.24 दशलक्ष टन अन्नधान्य, 5.32 दशलक्ष टन खाते व उर्वरके, 4.63 दशलक्ष टन सिमेंट (क्लिंकर सोडून) आणि 3.2 दशलक्ष टन खनिजीय तेल यासह 94.33 दशलक्ष टन माल वाहून नेला.

येत्या काळात मालवाहतुकीतील सुधारणांना संस्थात्मक स्वरूप येऊन त्यांचा अंतर्भाव शून्याधारित वेळापत्रकात केला जाणार आहे.

आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, रेल्वेतून मालवाहतूक अधिकाधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने, भारतीय रेल्वे अनेक सूट / सवलतीही देत आहे.

रेल्वेने सर्वांगीण क्षमताविकास आणि कामगिरीत सुधारणा करण्याच्या दिशेने कोविड-19 चा सदुपयोग करून घेत संकटाचे रूपांतर संधीत करून दाखवले आहे.
  

* * *

M.Iyengar/J.Waishampayan/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650404) Visitor Counter : 189