रेल्वे मंत्रालय

रेल्वे केवळ राज्य सरकारांनी पाठवलेले आणि सुविधा पुरवलेले प्रवासी घेत आहे


प्रवाशांचा कोणताही गट किंवा व्यक्तीनी स्थानकावर यायचे नाही, काही विशेष गाड्या केवळ राज्य सरकारच्या विनंतीवर चालविण्यात येत आहेत. इतर सर्व प्रवासी आणि उपनगरी गाड्या बंद राहतील. कोणत्याही स्थानकात तिकिटे विकली जात नाहीत. राज्य सरकारांकडून विनंती झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त रेल्वे अन्य कोणतीही गाडी सोडत नाही

प्रविष्टि तिथि: 02 MAY 2020 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2  मे 2020

 

रेल्वेकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या इतर व्यक्तींसाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार काही विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. इतर सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद राहतील.

रेल्वे केवळ राज्य सरकारांनी पाठवलेले आणि सुविधा पुरवलेले प्रवासी घेत आहे

प्रवाशांचा कोणताही गट किंवा व्यक्तीनी स्थानकावर यायला परवानगी  नाही. कोणत्याही स्थानकात तिकिटे विकली जात नाहीत. राज्य सरकारांकडून विनंती झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त रेल्वे अन्य कोणतीही गाडी चालवत नाही.

इतर सर्व प्रवासी आणि उपनगरी गाड्या बंद राहतील. त्यामुळे कुणीही रेल्वे स्थानकात येऊ नये.

त्यानुसार सर्वांना सूचना देण्यात आली आहे. याबद्दल कुणीही खोट्या बातम्या पसरवू नये.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1620583) आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu , Kannada