अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय साजरी करत आहे मोदी सरकारच्या सेवा, सुशासन आणि कल्याणाची 11 वर्षे

Posted On: 09 JUN 2025 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2025

 

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने (एमओएमए) आज मोदी सरकारच्या परिवर्तनकारी प्रवासाची, सेवा, सुशासन आणि कल्याणाची 11 वर्षे साजरी करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी भूषविले. कार्यक्रमाला मंत्रालय आणि त्याच्या संलग्न संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सरकारने साध्य केलेल्या प्रमुख टप्प्यांवर प्रकाश टाकण्यात आला तसेच पारदर्शकता, समावेशकता आणि प्रभावी सेवा पुरवण्याबाबत मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली, जसे की:

  • डिजिटायझेशन आणि पारदर्शकता: सर्व मंत्रालयीन योजना आता समर्पित पोर्टलद्वारे अंमलात आणल्या जात असल्यामुळे लाभार्थ्यांसाठी पूर्ण पारदर्शकता आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठीची सुलभता सुनिश्चित होते.
  • तृतीय-पक्ष पुनरावलोकन आणि लेखापरीक्षण: दायित्व  राखण्यासाठी आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी सर्व योजनांचे कठोर तृतीय-पक्ष पुनरावलोकन आणि लेखापरीक्षण केले जाते.
  • समावेशक धोरणनिर्मिती: राज्ये आणि हितसंबंधी सक्रियपणे सहभागी झाले असून त्यांच्या मौल्यवान सूचना धोरणात्मक चौकटीत समाविष्ट केल्या आहेत, ज्यामुळे वास्तवाची दखल सुनिश्चित होते.
  • वक्फ सुधारणा कायदा,2025: संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) द्वारे व्यापक विचारविनिमयानंतर, ऐतिहासिक वक्फ सुधारणा कायदा अधिसूचित करण्यात आला, ज्यामुळे वक्फ प्रशासन आणि समुदाय कल्याण मजबूत झाले.
  • उमीद केंद्रीय पोर्टल: 6 जून 2025 रोजी मंत्रालयाने उमीद केंद्रीय पोर्टल सुरू केले. हे पोर्टल कल्याणकारी योजना सुव्यवस्थित करणे आणि अल्पसंख्याक समुदायांना सक्षम बनविणे यासाठी बनवण्यात आलेले एक महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे.
  • वक्फ कायद्याअंतर्गत केंद्रीय नियम: या कायद्याअंतर्गत केंद्रीय नियमांची निर्मिती प्रगतीपथावर आहे.

सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या प्रगतीसाठी मंत्रालयाच्या ध्येयातील मुलभूत  पाऊले म्हणून या कामगिरीवर प्रकाश टाकला. समावेशक विकासासाठी निरंतर समर्पणाचे वचन देत, कुमार यांनी ViksitBharat@2047 च्या दृष्टिकोनानुसार परिश्रमपूर्वक काम करण्याच्या मंत्रालयाच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

2047 पर्यंत समृद्ध आणि समतापूर्ण भारत साकारण्यासाठी मनापासून योगदान देण्याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135231)
Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Odia