राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी आज राष्ट्रपती भवन येथे 'किती बदलले आहे साहित्य ? या दोन दिवसीय साहित्य परिषदेचे केले उद्घाटन

Posted On: 29 MAY 2025 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (29, मे 2025) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात 'किती बदलले आहे साहित्य ? या शीर्षकांतर्गत आयोजित दोन दिवसांच्या साहित्य परिषदेचे उद्घाटन केले.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, विद्यार्थीदशेपासूनच त्यांच्या मनात साहित्य आणि साहित्यिकांबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना आहे. काळानुरूप साहित्याप्रति  ही विशेष आदराची भावना आणखी खोलवर रुजली. राष्ट्रपती भवनात अनेक साहित्यिकांनी यावे अशी त्यांची इच्छा होती. या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी संस्कृती मंत्रालय आणि साहित्य अकादमीचे कौतुक केले.

राष्ट्रपतींनी नमूद केले की,आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि साहित्यिक परंपरांमध्ये अमर्याद विविधता आहे. परंतु या विविधतेमध्ये भारतीयत्वचे स्पंदन जाणवते. भारतीयत्वची ही भावना आपल्या देशाच्या सामूहिक अवचेतनातही खोलवर रुजलेली आहे.देशातील सर्व भाषा आणि बोलीभाषा त्या आपली भाषा आणि बोलीभाषा मानतात आणि सर्व भाषांमधील साहित्याला आपले मानतात असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, बदलत्या संदर्भांमध्ये शाश्वत मानवी मूल्यांची स्थापना ही कालातीत साहित्याची ओळख आहे. समाज आणि सामाजिक संस्था बदलल्या तसे आव्हाने आणि प्राधान्यक्रम बदलले आहेत आणि साहित्यातही बदल दिसून आले आहेत. परंतु साहित्यात असे काहीतरी आहे जे अनेक शतकांनंतरही प्रासंगिक राहिले आहे. प्रेम आणि करुणेचे साहित्यिक संदर्भ बदलत राहतात परंतु त्यांची भावनिक पार्श्वभूमी बदलत नाही. साहित्यातून प्रेरणा घेऊन, मनुष्य स्वप्ने पाहतो आणि ती प्रत्यक्षात साकार करतो.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आजचे साहित्य हे उपदेशात्मक असू शकत नाही. आजचे साहित्य हे प्रवचन असू शकत नाही. आजचे साहित्य हे नैतिकतेचे पुस्तक असू शकत नाही. आजचा लेखक एखाद्या सहप्रवाशासारखा चालतो, पाहतो आणि दाखवतो; अनुभव घेतो आणि इतरांना अनुभव देतो. या साहित्य संमेलनात वक्ते आणि सहभागी यांच्यात विधायक  संवाद स्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्या, परिषदेत 'भारताचे स्त्रीवादी साहित्य: नवीन मार्ग शोधणे'; 'साहित्यातील बदल विरुद्ध बदलाचे साहित्य'; आणि 'जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याच्या नवीन दिशा' या विषयांवर चर्चा होईल. देवी अहिल्याबाई होळकर यांची 300  वी  जयंती साजरी करणाऱ्या गाथेने त्याचा समारोप होईल.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2132550)