पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख


पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत जाहीर

Posted On: 17 JUN 2024 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2024

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळाला भेट देण्यासाठी निघाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.या अपघातातल्या मृतांच्या  कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य  पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.

पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्स वर पोस्ट केले;

पश्चिम बंगालमधील झालेला रेल्वे अपघात फारच दुःखद आहे. आपले प्रियजन गमावलेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी निघाले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले;

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातातील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तसेच अपघातातील जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025895) Visitor Counter : 50