सहकार मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान संमेलनाला केले संबोधित

Posted On: 26 AUG 2023 6:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान संमेलनाला संबोधित केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, इफ्कोचे अध्यक्ष दिलीप संघानी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून देशातील शेतकऱ्यांची अनेक दशकांची जुनी मागणी पूर्ण केली. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी देशात अनेक अभूतपूर्व कामे करत आहेत, जसे की स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या चांद्रयान-3 चे अलीकडे झालेले यशस्वी लँडिंग. ते म्हणाले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे संपूर्ण देशाला नवी उर्मी आणि आत्मविश्वास मिळाला आहे कारण आतापर्यंत दक्षिण ध्रुवावर इतर कोणताही देश पोहोचलेला नाही.

केंद्रीय सहकार मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना आणल्या आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये देत आहेत. याशिवाय कृषी कर्ज, पीक विम्याची अनेक कामे केली आहेत. ते म्हणाले की मागील सरकारची कृषीसाठीची आर्थिक तरतूद सुमारे 22000 कोटी रुपये होते, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 पटीने वाढवून 125000 कोटी रुपये केली आहे.

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मजबूत करण्यासाठी 20 हून अधिक योजना आणल्या आहेत. ते म्हणाले की, आज इफको 3500 हून अधिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशातील सहकारी संस्थांना बळकट करण्याचे काम करत आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था निर्माण करून प्रत्येक पंचायतीमध्ये पीएसीएस स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे, त्यांना त्यांचे उत्पादन निर्यात करता यावे आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी तीन नवीन सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 6000 रुपये वर्ग करून किसानमित्रम्हणून काम केले आहे.

***

N.Joshi/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952674) Visitor Counter : 91