आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
77व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधानांनी देशाचं भाग्य बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिचारिका, डॉक्टर आणि इतरांचं केलं कौतुक
प्रतिष्ठित लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील 50 परिचारिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले
"मानव केंद्रित दृष्टिकोनाशिवाय जगाचा विकास शक्य नाही", हे कोविडने आपल्याला शिकवले आहे
“जनऔषधी केंद्रांनी 20,000 कोटी रुपयांची बचत करून देशातील मध्यमवर्गीयांना नवीन बळ दिले आहे"
"जन औषधी केंद्रांची संख्या 25,000 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे"
Posted On:
15 AUG 2023 11:05AM by PIB Mumbai
नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून उत्सव पाहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी देशभरातील 50 परिचारिकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. विशेष पाहुण्यांमध्ये सरपंच, शिक्षक, शेतकरी, मच्छीमार अशा विविध क्षेत्रातल्या 1800 विशेष पाहुण्यांचा सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे भाग्य बदलण्यासाठी परिचारिका, डॉक्टर आणि इतरांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोविडने आपल्याला शिकवले आहे की मानव केंद्रित दृष्टिकोनाशिवाय जगाचा विकास शक्य नाही.
देशातील सार्वत्रिक आरोग्य सेवेचा विस्तार सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर जोर देऊन ते म्हणाले की, सरकारने त्यासाठी 70,000 कोटी रुपये आयुष्मान भारत मध्ये खर्च केले आहेत ज्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयांची आरोग्य हमी प्रदान करून देण्यात आली आहे.
यावेळी आपल्या संबोधनात, पंतप्रधानांनी 200 कोटींहून अधिक कोविड लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी आरोग्य कर्मचार्यांच्या विशेषत: अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या समर्पण आणि सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक केले. “कोविडच्या काळात आणि नंतर जगाला मदत केल्याने भारताला जगाचा मित्र म्हणून स्थापित केले आहे,” असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

एक पृथ्वी, एक आरोग्य आणि एक भविष्य या संकल्पनेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, “जनऔषधी केंद्रांनी देशातील मध्यमवर्गीयांना 20,000 कोटी रुपयांची बचत करून नवीन बळ दिले आहे.. जनऔषधी केंद्रांची संख्या सध्याच्या 10 हजार केंद्रांवरून 25,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट घेऊन आगामी काळात देश काम करणार आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली.
***
Snoal T/Shailesh M/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1948921)
Visitor Counter : 141