पंतप्रधान कार्यालय

भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 09 AUG 2023 11:50AM by PIB Mumbai

भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी चित्रफीत संदेशाद्वारे आपले विचार मांडले.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली.  गांधीजींच्या नेतृत्वाखाली या चळवळीने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली. आज भारत एका सुरात म्हणत आहे:

भ्रष्टाचार भारत छोडो.

घराणेशाही भारत छोडो.

तुष्टीकरण भारत छोडो."

*** 

S.Thakur/V.Ghode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946999) Visitor Counter : 147