पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे हरियाली महोत्सवाचे आयोजन
देशभरातील 75 नागरी भागातील वनांमध्ये वनीकरणाचे कार्य हाती घेणार
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2022 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे 8 जुलै 2022 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे हरियाली महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
हरियाली महोत्सव, हा शाश्वत जीवनात वृक्षांच्या महत्त्वाबद्दल सध्याच्या पिढ्यांच्याच नव्हे तर भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आयोजित केला जात आहे. हवामान बदलाचे विपरित परिणाम सौम्य करण्यात वृक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या महोत्सवाकडे लोकांमध्ये वन संवर्धनाबाबत तसेच वृक्ष लागवडीबाबत उत्साह भरण्याचे परिणामकारक साधन म्हणून पाहिले जात असल्याचे मानले जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सरकारचे धोरण आणि उपक्रम यांना पूरक म्हणून या महोत्सवाचे मोठे महत्त्व आहे.
हरियाली महोत्सव 2022 केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे आयोजित केला जाणार असून राज्य सरकारे, पोलिस संस्था आणि दिल्लीतील शाळा यांच्या सहकार्याने वनीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. देशभरातील 75 नागरी भागातील वने, 75 पोलिस ठाणी आणि दिल्ली/ एनसीआरमधील शाळा तसेच विविध राज्यांमधील 75 उजाड झालेल्या वनीकरण स्थळांवर वृक्षारोपण मोहिमा आयोजित केल्या जाणार आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु तसेच गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि जीएनसीटीडीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना या कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत.
रिकी केज यांची मैफल हे या कार्यक्रमाच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
S.Kulkarni /U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1839676)
आगंतुक पटल : 195