कोळसा मंत्रालय
कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधील कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ
पुढच्या आर्थिक वर्षात कोळसा उत्पादन 120 दशलक्ष टनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा
Posted On:
04 DEC 2021 4:24PM by PIB Mumbai
यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशातील कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधून सुमारे 50 दशलक्ष टन कोळसा उत्पादन झाले असून विद्यमान आर्थिक वर्षात (2021-22) ते 85 दशलक्ष टन पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 62 दशलक्ष टन कोळसा उत्पादनापेक्षा या वर्षी कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोळशाच्या देशांतर्गत वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, कोळशाचे उत्पादन आणखी वाढविण्यासाठी, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. अनिल कुमार जैन यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नव्या कोळसा खाणींच्या विकासावर परिणाम करणाऱ्या पर्यावरण आणि वनेविषयक परवानग्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेतला.आगामी आर्थिक वर्षापर्यंत (2022-23) देशातील कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधून होणारे कोळसा उत्पादन 120 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या सफलतेमुळे, देशांतर्गत कोळसा उत्पादनात आत्मनिर्भर भारत घडविण्याची संकल्पना साकारण्यात मदत होईल.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778014)
Visitor Counter : 133