पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाने वर्ष  2018-19  वर्षासाठी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवल्या


प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2021

Posted On: 05 JUL 2021 7:45PM by PIB Mumbai

 

पर्यटन मंत्रालयाने पर्यटन क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. राज्य सरकारे  / केंद्रशासित प्रदेश, वर्गीकृत हॉटेल्स , हेरिटेज हॉटेल्स, मान्यताप्राप्त  ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर आणि टूरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, व्यक्ती आणि इतर खासगी संस्थांनी आपापल्या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीच्या सन्मानार्थ  आणि  पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने निकोप स्पर्धेस प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार विविध श्रेणीअंतर्गत  प्रदान केले जातात.

प्रवेशिका  निर्दिष्ट सूचनेनुसार योग्य स्वरूपात पाठवाव्यात. जर  नमूद केले नसेल तर  एप्रिल, 2018 ते मार्च 2019 या कालावधीत हाती घेतलेले उपक्रम  ग्राह्य धरले जातील.

संबंधित विभागात प्रवेशिका पाठवण्याची  शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 (संध्याकाळी चार वाजता) आहे आणि प्रवेशिका हार्ड कॉपी स्वरूपात  आणि निर्दिष्ट केलेल्या स्वरूपात  पाठवाव्यात. 2018-19  च्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे तपशील व मार्गदर्शक तत्वे पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर www.tourism.gov.in  देण्यात आली  आहेत

***

M.Chopade/S.Kane/P.Ko

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732890) Visitor Counter : 193