संरक्षण मंत्रालय

मिशन सागर- 2


आयएनएस ऐरावतमार्फत सुदानला अन्नधान्याची मदत

Posted On: 02 NOV 2020 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020

भारतीय नौसेनेने सुरू केलेल्या मिशन सागर-2 चा एक भाग म्हणून आयएनएस ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन, आज- दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले. या मोहिमेमध्ये भारत सरकारच्या वतीने आपल्या मित्र देशांना नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. सुदानच्या जनतेसाठी  भारताने दिलेल्या 100 टन अन्नधान्याची मदत आयएनएस ऐरावतमार्फत पाठविण्यात आली.

मिशन सागर-2 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली. मिशन सागर-2 चा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ऐरावत जहाजामार्फत सुदान, दक्षिण सुदानडिबुती आणि एरिट्रिया येथे मदत पाठविण्यात आली आहे.

आपल्या सागरी शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी या देशांना संकटकाळामध्ये मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून मिशन सागर-2 सुरू करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयातून ही मोहीम पार पाडण्यात येत आहे.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669621) Visitor Counter : 157