कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या वतीने दक्षता जागृती सप्ताह साजरा
Posted On:
02 NOV 2020 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020
कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रामाणिकतेची शपथ दिली आणि सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कोविड-19 महामारीच्या काळामध्ये या विभागाने ‘सुशासन पद्धतीविषयी आयडिया बॉक्स’ हा कार्यक्रम जारी केला त्यानुसार ई-प्रशासनाविषयी सर्वोत्तम पद्धतींवर समाज माध्यमांवर ट्वीट प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे अनेक कल्पना समोर आल्या. आता या विभागामार्फत तसेच मायगव्ह या मंचावर या कल्पना कार्यान्वित करण्यात येत आहेत असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पुनरूच्चार केला. यासाठी कर्मचारी निवड पद्धतीमध्ये परिवर्तन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे राष्ट्रीय भरती संस्थेमार्फत जो उमेदवार सामान्य पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याला नोकरीच्या संधी प्राप्त होतील, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
‘सतर्क भारत, समृद्ध भारत’ या विषयावर गोलमेज चर्चासत्राचे आयोजनही या सप्ताहात करण्यात आले होते. गोलमेज चर्चेत “नैतिक भारत” च्या पाठपुराव्यात प्रतिबंधात्मक दक्षतेच्या मुख्य मुद्यांवर लक्ष केंद्रित केले गेले ज्यात सार्वजनिक सेवेत नैतिकतेचे प्रशिक्षण, नैतिक पद्धतींचे सामाजिक लेखापरीक्षण, भ्रष्टाचाराच्या निकषांचे मोजमाप विकसित करणे आणि प्रशासनावर होणारा भ्रष्टाचाराचा परिणाम यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयातल्या संबंधित विभागाचे अधिकारी, सचिव, कर्मचारी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञा घेवून दक्षता दिन कार्यक्रम साजरा केला.
S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669616)
Visitor Counter : 225