ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21साठी किमान आधारभूत किंमतीने झालेले व्यवहार

Posted On: 18 OCT 2020 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020

खरीप पिकांच्या 2020-21 च्या  विपणन हंगामाला प्रारंभ झाला असून, गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही किमान आधारभूत किंमतीनूसार खरेदीला सुरुवात झाली आहे.

खरीप पिकांच्या 2020-21 विपणन हंगामातील तांदळाची खरेदी सुरळीतपणे सुरू असून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगड, केरळ आणि जम्मू आणि काश्मीर या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 7.38 लाख शेतकऱ्यांकडून 84.46 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त तांदळाची खरेदी 17.10.2020 पर्यंत झाली.

विविध राज्यांतून आलेल्या खरेदीच्या प्रस्तावांनुसार 2020-21 च्या खरीप पिकांच्या विपणन हंगामासाठी किंमत समर्थन योजनेनुसार (PSS)  तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांतून 41.67 लाख टन  खरीप डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतून 1.23 टन खोबऱ्याच्या (बारमाही पीक) खरेदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मूल्याधार योजनेअंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबऱ्याच्या खरेदीचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. तसेच या पीकांच्या किंमती एमएसपीपेक्षा खाली आल्यास राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय नोडल संस्थांकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी केली जाईल.

17.10.2020 पर्यंत सरकारने नोडल संस्थांमार्फत 723.79 मेट्रिक टन मूग आणि उडदाची किमान आधारभूत मूल्याने खरेदी केली, त्यासाठी 5.21 कोटी रुपये दिले. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा येथील 681 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. तसेच 5089 मेट्रिक टन खोबरे(बारमाही पीक), 52.40 कोटी रुपये किमान आधारभूत मूल्यानुसार खरेदी केले, ज्याचा कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 3961शेतकऱ्यांना लाभ झाला. खोबऱ्याच्या आणि उडीद   पीकांच्या बाबतीत  त्यांचे दर मुख्य उत्पादक राज्यांत किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. खरीपाच्या डाळी आणि तेलबिया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यावर त्या त्या राज्यांनी ठरविलेल्या तारखांप्रमाणे सरकारकडून खरेदी सुरु करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केली जात आहे.

कापूस खरेदी हंगाम 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाला असून कापूस महासंघाने 17 ऑक्टोबरपर्यंत एमएसपीनुसार 46697.86 लाख  रुपयांचा एकूण 165369 गाठी कापूस  खरेदी केला असून 32994 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665708) Visitor Counter : 153