पंतप्रधान कार्यालय

बिहार आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वीज पडून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 25 JUN 2020 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2020

बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि आकाशातून वीज कोसळून अनेक लोक मरण पावल्याचे दुःखद वृत्त समजले आहे. राज्य सरकारे तत्परतेने बचाव कार्यात गुंतली आहे. या आपत्तीमध्ये ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांच्या कुटुंबियांविषयी मी सहानुभूती व्यक्त करत आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634477) Visitor Counter : 115