रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने 12.05.2020 पासून सुरु असलेल्या राजधानी श्रेणीच्या 30 विशेष गाड्या आणि 01.06.2020 पासून सुरु होणाऱ्या 200 विशेष मेल एक्सप्रेस गाड्यांसाठीच्या (एकूण 230 गाड्या) निर्देशांमध्ये केली सुधारणा


रेल्वे मंत्रालयाने सर्व विशेष गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 30 दिवसांवरून वाढवून 120  दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व 230 गाड्यांमध्ये पार्सल आणि सामानाच्या आरक्षणाची परवानगी असेल

वरील बदलांची अंमलबजावणी 31 मे 2020 च्या रेल्वे आरक्षण तारखेच्या सकाळी 08:00 वाजल्यापासून होईल

Posted On: 28 MAY 2020 11:00PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने 12.05.2020 पासून सुरु असलेल्या राजधानी श्रेणीच्या 30 विशेष गाड्या आणि 01.06.2020 पासून सुरु होणाऱ्या 200 विशेष मेल एक्सप्रेस गाड्यांसाठीच्या (एकूण 230 गाड्या) निर्देशांमध्ये सुधारणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व विशेष गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 30 दिवसांवरून वाढवून 120  दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व 230 गाड्यांमध्ये पार्सल आणि सामानाच्या आरक्षणाची परवानगी असेल.

वरील बदलांची अंमलबजावणी 31 मे 2020 च्या रेल्वे आरक्षण तारखेच्या सकाळी 08:00 वाजल्यापासून  होईल.

सध्याचे आरक्षण, रस्त्यांच्या कडेला असलेल्या स्थानकांवर तिकिटांचे तात्काळ आरक्षण  वाटप इत्यादी इतर अटी नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाड्यांप्रमाणेच असतील.

या सूचना वाहतूक वाणिज्यिक संचालनालयाच्या मुख्य वाणिज्यिक परिपत्रकांतर्गत भारतीय रेल्वेच्या   www.windianrailways.gov.in या संकेतस्थळावर देखील पाहिल्या जाऊ शकतात.

 

M.Jaitly/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627617) Visitor Counter : 301