कृषी मंत्रालय

2019-20 साठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर व्यावसायिक पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अग्रिम अंदाज

Posted On: 15 MAY 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15  मे 2020

कृषी, सहकार्य आणि शेतकरी कल्याण विभागाने सन 2019-20 मधील प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा अग्रिम अंदाज प्रसिद्ध केला आहे. देशात मान्सून हंगामात  (जून ते सप्टेंबर 2019) होणारा पाऊस हा दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा (एलपीए) 10% जास्त होता. त्यानुसार, कृषी वर्ष 2019-20 मधील बहुतेक पिकांचे उत्पादन त्यांच्या सामान्य उत्पादनापेक्षा जास्त असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आगामी काळात अधिक अचूक माहितीनुसार  या अंदाजात बदल होऊ शकतील.

तिसऱ्या अग्रिम अंदाजानुसार, 2019-20 मध्ये प्रमुख पिकांचे अंदाजे उत्पादन खालीलप्रमाणे आहे:-

अन्नधान्य - 295.67 दशलक्ष टन. (विक्रमी )

तांदूळ - 117.94 दशलक्ष टन. (विक्रमी )

गहू - 107.18 दशलक्ष टन. (विक्रमी )

पोषक / भरड धान्य - 47.54 दशलक्ष टन. (विक्रमी )

मका - 28.98 दशलक्ष टन. (विक्रम)

डाळी - 23.01 दशलक्ष टन.

तूर - 3.75 दशलक्ष टन.

हरभरा - 10.90 दशलक्ष टन.

तेलबिया - 33.50 दशलक्ष टन. (विक्रमी )

सोयाबीन - 12.24 दशलक्ष टन

रेपसीड आणि मोहरी - 8.70 दशलक्ष टन

भुईमूग - 9.35 दशलक्ष टन

कापूस - 36.05 दशलक्ष गाठी (170 किलो प्रति गाठी) (विक्रमी )

जूट आणि मेस्टा - 9.92 दशलक्ष गाठी (180 किलो प्रति गाठी)

ऊस - 358.14 दशलक्ष टन

2019-20 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन विक्रमी 295.67 दशलक्ष टन एवढे राहील असा अंदाज आहे, जे सन 2018-19 मधील 285.21 दशलक्ष टन धान्य उत्पादनापेक्षा 10.46 दशलक्ष टन जास्त आहे. तथापि,2019-20 मधील उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत (2014-15 to 2018-19) 25.89 दशलक्ष टन जास्त आहे .

सन 2019-20 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन विक्रमी 117.94 दशलक्ष टन एवढे राहील असा अंदाज आहे. पाच वर्षांच्या 109.77 दशलक्ष टन सरासरी उत्पादनापेक्षा हे 8.17 दशलक्ष टनांनी जास्त आहे.

2019-20 दरम्यान गहू उत्पादन विक्रमी 107.18 दशलक्ष टन राहील असा अंदाज आहे. सन 2018-19 मधील गहू उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण 3.58 दशलक्ष टन जास्त आहे आणि गव्हाच्या सरासरी 96.16 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 11.02 दशलक्ष टन जास्त आहे.

पोषक/भरड धान्याचे उत्पादन विक्रमी .47.54 दशलक्ष टन राहील असा अंदाज आहे जे 2018-19 दरम्यान झालेल्या 43.06 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 4.48 दशलक्ष टन अधिक आहे. शिवाय सरासरी उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाणही 4..50 दशलक्ष टनांनी जास्त आहे.

2019-20 दरम्यान डाळींचे एकूण उत्पादन 23.01 दशलक्ष टन एवढे राहील असा अन्दाज आहे जे पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 20.82 दशलक्ष टनांपेक्षा 2.19 दशलक्ष टन जास्त आहे. 2019-20 मध्ये देशातील तेलबियांचे एकूण उत्पादन विक्रमी. 33.50 दशलक्ष टन राहिल असा अंदाज आहे. जे 2018-19 मधील .31.52 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 1.98 दशलक्ष टन जास्त आहे. तसेच 2019-20 दरम्यान तेलबियांचे उत्पादन सरासरी तेलबिया उत्पादनाच्या तुलनेत 4.10 दशलक्ष टन जास्त आहे.

सन 2019-20 मध्ये देशात ऊसाचे एकूण उत्पादन 358.14 दशलक्ष टन एवढे राहील असा अंदाज आहे.

कापसाचे उत्पादन 2018-19 मधील 28.04 दशलक्ष गाठी उत्पादनापेक्षा 8.01 दशलक्ष गाठी म्हणजेच विक्रमी 36.05 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) अधिक असल्याचा अंदाज आहे. जूट आणि मेस्टाचे उत्पादन अंदाजे 9.92 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 180 किलो) आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624109) Visitor Counter : 215