पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहणारे आणि शक्ती, न्याय, एकता यावर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषितम पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 30 DEC 2025 12:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2025

 

30 डिसेंबर 1943  रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे अतुलनीय धैर्य आणि पराक्रमाने तिरंगा फडकवला होता. या ऐतहासिक प्रसंगाचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांना आदरांजली वाहिली आहे.

इतिहासातील हा क्षण देशाला आठवण करून देतो की स्वातंत्र्य केवळ आकांक्षेने मिळत नाही तर ते शक्ती, कठोर परिश्रम, न्याय आणि सामूहिक दृढनिश्चयाने मिळवले जाते.

ही भावना व्यक्त करण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी एक्सवरील एका पोस्टमध्ये एक कालातीत सुभाषितम शेअर केले:

"30 डिसेंबर 1943 रोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये धैर्य आणि शौर्यासह तिरंगा फडकवला. तो क्षण आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य केवळ आकांक्षेने नव्हे तर शक्ती, कठोर परिश्रम, न्याय आणि संघटित दृढनिश्चयाने आकार घेते. आजचे सुभाषित ही भावना व्यक्त करते..."

सामर्थ्यमूलं स्वातन्त्र्यं श्रममूलं च वैभवम्।

न्यायमूलं सुराज्यं स्यात् सङ्घमूलं महाबलम् ॥”

 

* * *

नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2209721) अभ्यागत कक्ष : 43