उपराष्ट्रपती कार्यालय
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांचे स्मरण करून उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी आदरांजली वाहिली
उत्तर प्रदेश येथील कुलगुरूंची 99 वी वार्षिक बैठक आणि राष्ट्रीय परिषदेच्या (2024–2025) उद्घाटन सत्राला उपराष्ट्रपतींनी संबोधित केले
Posted On:
23 JUN 2025 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांनी आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, "आपल्या भारत मातेच्या सर्वोत्तम सुपुत्रांपैकी एक, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी. आज त्यांचा बलिदान दिवस आहे. त्यांनी नारा दिला, एक विधान, एक निशान और एक प्रधान ही होगा देश में दो नहीं होंगे. 1952 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्यात प्रचारा दरम्यान त्यांनी हे म्हटले होते.”
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) द्वारे आयोजित कुलगुरूंची 99 वी वार्षिक बैठक आणि राष्ट्रीय परिषदेच्या (2024–2025) उद्घाटन सत्राला संबोधित करताना, राष्ट्रीय शिक्षण धोरणावर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती धनखड़ म्हणाले, “हे धोरण आपल्या संस्कृतीच्या भावनेशी, साराशी आणि मूल्यांशी सुसंगत आहे. शिक्षण म्हणजे केवळ कौशल्य शिक्षण नव्हे, तर आत्मजागृती आहे, या भारताच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या विश्वासाचा हा ठाम पुनरुच्चार आहे.”
भारताच्या राष्ट्रीय प्रगतीची प्रशंसा करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “भारत हा संधींचा, उद्योजकतेचा, स्टार्टअप्सचा, नवोन्मेषाचा आणि युनिकॉर्नचा देश म्हणून उदयाला आला आहे. वृद्धी आणि विकास मोजण्याच्या प्रत्येक निकषावर आपण प्रगती करत आहोत.”
विद्यापीठांच्या भूमिकेवर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले, 'आपली विद्यापीठे केवळ पदवी देण्यासाठी नाहीत. पदवीला मोठी मान्यता हवी. विद्यापीठे ही कल्पना आणि विचारसरणीचे आश्रयस्थान, नवोन्मेशाची केंद्रे असावीत. या ठिकाणांनी मोठा बदल घडवून आणायला हवा.”
उदयोन्मुख क्षेत्रात नेतृत्व प्रस्थापित करण्याचे आवाहन करून आपल्या भाषणाचा समारोप करताना उपराष्ट्रपती म्हणाले, " कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, हवामान तंत्रज्ञान, क्वांटम विज्ञान, डिजिटल नीतिमत्ता, यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या संस्था स्थापन कराव्यात . मग भारत नेतृत्व करेल, इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतील. हे एक आव्हान आहे.”
शिक्षण हे केवळ लोकहितासाठी नाही. ही आपली सर्वाधिक धोरणात्मक राष्ट्रीय संपत्ती आहे. ते केवळ आपल्या पायाभूत सुविधा अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील विकास प्रवासाशी जोडले गेले नसून, ते राष्ट्रीय सुरक्षेची हमी देखील देते.”
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139010)