गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार  अमित शाह यांनी आज मुंबईत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर (MACCIA) च्या नवनिर्मित मुख्यालय इमारतीचे उद्घाटन केले आणि  ते राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेत सहभागी झाले.


मोदीजींनी 'टीम भारत'ची संकल्पना मांडली आहे, कारण भारताचा विकास राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊनच करू शकतात. या रचनात्मक भावनेमुळे आज आपला देश खूप प्रगती करत आहे.

जागतिकीकरणाच्या या युगात देशभरातील चेंबर ऑफ कॉमर्सला आपली उपयुक्तता आणखी वाढवण्यासाठी काम केले पाहिजे

महाराष्ट्रात अमाप शक्यता आहेत आणि हे राज्य एका प्रकारे देशाच्या औद्योगिक विकासाचा पर्याय आणि परिचय आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार राबवत आहेत 7 लाख कोटी रुपयांहून जास्त खर्चाचे प्रकल्प

मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या विकासात महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान

महाराष्ट्राला नव्या दूरदर्शीपणाने पुढे नेण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्वात एनडीएस सरकार करत आहे.

आमचे सरकार समस्येच्या मुळाशी जाऊन काम करते, यामुळेच विदर्भ आणि मराठवाड्याला दुष्काळग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्याचे काम होत आहे.

Posted On: 20 JUN 2025 8:17PM by PIB Mumbai

 

MACCIA (महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर) सरकारकडे भविष्यातील गरजांसाठी धोरणे, कायदे आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची मागणी करत आहे, तसेच व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील समस्या सरकारसमोर मांडण्याचे काम करत आहे

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या (MACCIA) मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आणि राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेला उपस्थित राहिले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात अफाट क्षमता असून हे राज्य देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनण्याचा सन्मान मिळाला आहे. ते म्हणाले की महाराष्ट्रानेही देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, पण आपल्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला नवी ऊर्जा देण्याचे आणि नवा दृष्टीकोन विकसित करण्याचे काम केले आहे.

ते म्हणाले की, आज महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रातून येते आणि या गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 39 टक्के आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटक महाराष्ट्रात येतात, बहुतेक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत आणि देशातील एकूण स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा वाटा 25 टक्के आहे. ते म्हणाले की वाढवण, हे भारताचे सर्वात मोठे बंदर आता महाराष्ट्रात बांधले जाणार आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या मातांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून बुलेट ट्रेन योजनेत महाराष्ट्र अग्रेसर राज्य ठरले आहे.

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी 7 लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. ते म्हणाले की, दीड लाख कोटी रुपयांच्या 337 किलोमीटर च्या मेट्रोचे बांधकाम केवळ मुंबईत सुरू झाले आहे, 17,000 कोटी गुंतवणुकीचा अटल सेतू, 13  हजार कोटी रुपये खर्चाचा कोस्टल रोड, 11 हजार कोटी रुपये खर्चाचा वांद्रे-वर्सोवा सी लिंक, 55 हजार कोटी रुपये खर्चाचा वर्सोवा-विरार सी लिंक, 60 हजार कोटी रुपये खर्चाचा विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, ठाणे कोस्टल रोड 2535 कोटी रुपये खर्चाचा ठाणे कोस्टल रोड, 16 हजार कोटी रुपये खर्चाचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोगदा, 3780 कोटी रुपये खर्चाचा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, 1 लाख 08 हजार कोटी रुपये खर्चाची मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे, 80 हजार कोटी रुपये खर्चाचे वाढवण बंदर आणि २३ हजार कोटी रुपयांचे पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात आले आहेत.

शाह म्हणाले की, मागील सरकारांनी मुंबईला तिच्या नशिबावर सोडले होते, पण पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या डबल इंजिन सरकारने 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करून मुंबईला वाचवण्याचे काम केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी सांगितले की मागील सरकारांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही.  ते म्हणाले की मोदी सरकारने महाराष्ट्रासाठी गेल्या 11 वर्षात भरपूर काम केले आहे.  त्यांनी सांगितले की 11 वंदे भारत चालवण्यात आल्या, 128 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो नेटवर्कचा विकास केला, शिर्डी आणि सिंधुदुर्गात विमानतळ तयार केले, विदर्भाच्या दुष्काळग्रस्त भागासाठी 11 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प, 11 औद्योगिक मार्गिकांमधील तीन मार्गिका भारत सरकारने महाराष्ट्राला दिल्या आणि 12 टेक्स्टाईल पार्कपैकी 7 महाराष्ट्राला दिले.

अमित शाह म्हणाले की मोदी सरकारने विदर्भ आणि मराठवाडा, जे  चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून दुष्काळग्रस्त आहेत, तिथे कधीही दुष्काळ पडणार नाही, अशा भागात रुपांतर करण्यासाठी गुंतवणुकीची योजना तयार केली आणि तेव्हा कुठे शेतकऱी आत्महत्या थांबल्या.  त्यांनी सांगितले की कृषी आणि उद्योग दोन्हीही पाण्याशिवाय चालू शकणार नाहीत. शाह म्हणाले की हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती समस्येच्या मुळाशी जाऊन तिचा विचार करते . ते म्हणाले की मोदीजींच्या नेतृत्वात देशभरात सममिती म्हणजेच एकसमान विकास झाला आहे. 2014 मध्ये देशाच्या पायाभूत सुविधांसाठी 1 लाख 51 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्यामध्ये मोदी सरकारने आज वाढ केली आणि ती 10 लाख 95 हजार कोटी रुपये करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की 2014 पूर्वी देशात जितक्या वीजेच्या ग्रीड होत्या त्याच्या 107 टक्के जास्त नव्या वीज ग्रीड लावण्याचे काम गेल्या 10 वर्षात झाले आहे. 2004 ते 2014 दरम्यान, महाराष्ट्राला 1 लाख 91 हजार कोटी रुपयांची डिव्हॉल्युशन आणि अनुदान मिळाले. मोदी सरकारने केवळ धोरणेच तयार केली नाहीत तर  त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दिवसरात्र कष्ट केले आहेत. ते म्हणाले की पंतप्रधान मोदीजींनी टीम भारताची संकल्पना मांडली आहे कारण भारताचा विकास राज्य आणि केंद्र एकजुटीनेच करू शकतात. या मूलभूत भावनेमुळे आज देश खूप पुढे जात आहे, असे ते म्हणाले.

***

JPS/R.Agashe/S.Patil/P.Kor


(Release ID: 2138179)