पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

140 कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि सामूहिक सहभागामुळे, भारताने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान परिवर्तन पाहिले आहे, सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट भर : पंतप्रधान


आम्हाला आमच्या सामूहिक यशाचा अभिमान आहे पण त्याच वेळी, आम्ही आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत: पंतप्रधान

गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता-‘Ease of Living’ मध्येही वाढ झाली आहे: पंतप्रधान

पंतप्रधानांकडून नागरिकांना NaMo अ‍ॅपद्वारे भारताच्या परिवर्तनीय प्रवासाचा शोध घेण्याचे आवाहन

Posted On: 09 JUN 2025 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2025

 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एनडीए सरकारच्या काळात गेल्या अकरा वर्षांत भारतात झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला आहे. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे, असे मोदी यांनीसांगितले.

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाचे मार्गदर्शन घेत, एनडीए सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे, हे मोदी यांनी अधोरेखित केले.

आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली आवाज बनला आहे, असे मोदी यांनी सांगितले. आपल्या सामूहिक यशाचा आपल्याला अभिमान आहे, मात्र त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी पुढे जात आहोत, असे मोदी म्हणाले. गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता- ‘Ease of Living’ मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.  

या अनुषंगाने, मोदी यांनी नागरिकांना NaMo अ‍ॅपद्वारे भारताच्या या परिवर्तनीय प्रवासाचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. या अ‍ॅपमध्ये सरकारची कामगिरी खेळ, प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण यासह अन्य माहिती देण्यात आली असून, त्यात माहितीपूर्ण तसेच प्रेरणा देणाऱ्या घटकांचा समावेश आहे.

या शिवाय, NaMo अ‍ॅप आणि अधिकृत वेबसाइटवर व्हिडिओ, माहितीचित्रे आणि लेख यांसारख्या आकर्षक स्वरूपांत भारताच्या ‘विकास यात्रेचे सादरीकरण करण्यात आले आहे, नागरिकांनी हे नक्कीच पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले की, 

"सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट भर !

140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे. 

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाचे मार्गदर्शन घेत, एनडीए सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत . आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे. 

आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली आवाज बनला आहे. आपल्या सामूहिक यशाचा आपल्याला अभिमान आहे, मात्र त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी पुढे जात आहोत. गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता- ‘Ease of Living’ मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. 

NaMo अ‍ॅपच्या माध्यमातून सरकारच्या परिवर्तनकारी प्रवासाची माहिती घेता येईल, अ‍ॅपमध्ये सरकारची कामगिरी खेळ, प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण आणि अन्य माहिती देण्यात आली असून, त्यात माहितीपूर्ण तसेच प्रेरणा देणाऱ्या घटकांचा समावेश आहे. नागरिकांनी हे नक्कीच पाहावे.

 

 

 

 

* * *

JPS/R.Dalekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135097)