कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भुवनेश्वर येथील आयसीएआर- सीआयएफए येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’चा केला प्रारंभ
Posted On:
29 MAY 2025 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2025
केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ओदिशामधील कौसल्यगंगा येथील भारतीय कृषी संशोधन परिषद - गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केंद्रीय संस्था (आयसीएआर- सीआयएफए) येथे विकसित कृषी संकल्प अभियानाचा (व्हीकेएसए-2025) प्रारंभ केला.भारतीय कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा एका ऐतिहासिक उपक्रम आहे.


ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि शाश्वत भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. ही मोहीम देशभरात प्रगत कृषी आणि मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.
शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना, तंत्रज्ञानाचा प्रसार, क्षमता बांधणी आणि तळागाळातील लोकांच्या सहभागाद्वारे देशातील 1.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेच्या महत्त्वाकांक्षी ध्येयावर, प्रकाश टाकला. मत्स्यव्यवसाय हा भारताच्या अन्न सुरक्षेचा एक अविभाज्य आधारस्तंभ आणि उपजीविकेच्या विकासासाठी एक व्यवहार्य मार्ग आहे यावर मंत्र्यांनी भर दिला. आयसीएआर-सीआयएफएने विकसित केलेले तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल तसेच विकसित आणि मजबूत मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण होईल यावरही त्यांनी भर दिला.
विकसित कृषी संकल्प अभियान-2025 हे खरीपपूर्व परिवर्तनकारी अभियान असल्याचे आयसीएआरचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांनी सांगितले. ही मोहीम शेतकऱ्यांच्या गरजांची अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनाबरोबर सांगड घालणारी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सर्व भागधारकांना विकसित भारतासाठी विकसित कृषीचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सर्व हितसंबंधीनी एकत्र यावे असे आवाहन जाट यांनी केले. यामुळे भारतीय कृषी क्षेत्रात समृद्धी आणि भरभराट सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.
बचतगटातील गटातील 600 हून अधिक महिला आणि पुरुष शेतकरी शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद सत्रात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी या सत्रातून शाश्वत पद्धती, सुधारित तंत्रज्ञान तसेच शेती आणि मत्स्यपालनासाठी एकात्मिक दृष्टिकोनांबद्दल माहिती मिळवली.
आजच्या दिवसाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय कृषी मंत्र्यानी"सीआयएफए अर्गु व्हॅक्स-आय" या माशांच्या नाविन्यपूर्ण लसीचे अनावरण केले. आयसीएआर- सीआयएफएने विकसित केलेली ही लस माशांमधील परजीवींना लक्ष्य करते, ज्यामुळे माशांच्या आरोग्य व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण प्रगती घडून मत्स्यपालनातील आर्थिक नुकसान कमी होईल.
S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132549)