पंतप्रधान कार्यालय
कोल्हापूरच्या राजघराण्याच्या महानतेबद्दल ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी अतिशय सुरेख लेख लिहिला आहे : पंतप्रधान
Posted On:
22 AUG 2024 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोल्हापूरचे राजघराणे, द्रष्टे महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या महानतेविषयी ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी अतिशय सुरेख लेख लिहिला आहे. मोदी म्हणाले की, सर्वांविषयी त्यांच्या मनात असलेली करुणेची भावना भावी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात माजी सचिव असलेले ज्ञानेश्वर मुळ्ये हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराचा पोलंडशी अतुलनीय संबंधांवर त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये लेख लिहिला आहे.
ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी लिहिलेल्या लेखाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
"कोल्हापूरचे राजघराणे, द्रष्टे महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या महानतेवर ज्ञानेश्वर मुळ्ये यांचा अतिशय सुरेख लेख. त्यांच्या ठायी असलेल्या अतुलनीय करुणेची भावना भावी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047876)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam