श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गेल्या 9 वर्षांत कामगार धोरणातील सुधारणांनी किमान वेतन, नोकरी तसेच सामाजिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करत कामगारांचे सक्षमीकरण सुनिश्चित केले - केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 22 JUN 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या 9 वर्षांत असंघटित आणि संघटित दोन्ही क्षेत्रातील कामगारांसाठी विविध कल्याणकारी कामे केल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली इथे सांगितले. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या 9 वर्षांच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देश आता बदलत आहे, सुधारणा करत आहे आणि कामगार कायदे आणखी सोपे करत आहे. हीच बाब लक्षात ठेवून 29 कामगार कायद्यांचे 4 सोप्या कामगार संहितांमध्ये रूपांतर करण्यात आले असल्याचे यादव म्हणाले. यामुळे किमान वेतन, नोकरीची सुरक्षा, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा याद्वारे कामगारांचे सक्षमीकरण सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.

भूपेंद्र यादव यांनी याप्रसंगी ई-श्रम पोर्टल, नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस), आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय), प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पीएम-एसवायएम) यांसारख्या कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाच्या विविध योजनांवर तसेच या योजनांमुळे कामगारांना होत असलेल्या फायद्यांवरही प्रकाश टाकला.   

ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटा बेस तयार करण्याच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक असल्याचे यादव यांनी सांगितले. 

  

डिजिटल व्यासपीठावर रोजगाराशी संबंधित विविध सेवा प्रदान करण्यासाठी 2015 मध्ये राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) सुरू करण्यात आली होती, असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले.

कामगार संहिते अंतर्गत किरकोळ गुन्ह्यांना गुन्हे वर्गीकरणातून वगळणे, मातृत्व लाभ, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती मधील नोकरी शोधणार्‍यांसाठी तसेच विडी / सिने/ कोळसा खाणी व्यतिरिक्त कामगारांसाठी कामगार कल्याण योजना यासारख्या गेल्या 9 वर्षातल्या  विविध धोरणात्मक सुधारणा  यादव यांनी अधोरेखित केल्या.

  

केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या नऊ वर्षात कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) झालेल्या महत्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) सदस्यसंख्या 2014-15 मधील 15.84 कोटी वरून वाढत जाऊन 2021-22 मध्ये 27.73 कोटी झाली आहे, अशी माहिती यादव यांनी या क्षेत्रातील प्रमुख घडामोडींवर प्रकाश टाकताना दिली. 2014-15 मध्ये कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे 130.21 लाखांचे दावे निकाली निघाले होते, हा आकडा वाढून तो आता 390.97 लाखांवर पोहोचला आहे, असे यादव यांनी सांगितले.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934621)