कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या उज्जैन जिल्ह्यातल्या प्रक्षेपण कार्यक्रमात जनसामान्यांसह केंद्रीय मंत्री तोमर यांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
30 APR 2023 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2023
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज मध्य प्रदेशील उज्जैन जिल्ह्यात बाडनगर या गावात सर्वसामान्य जनतेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’कार्यक्रमाच्या 100 व्या भागात त्यांचे विचार ऐकले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना तोमर म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर नेता आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून लाभल्यामुळे आपल्या सर्वांसाठी हे अभिमानाचे युग आहे. गावांमध्ये राहणाऱ्या गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याला त्यांचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीला प्राधान्य दिले असून त्यासाठी ते सातत्याने झटत आहेत, असे तोमर यांनी नमूद केले.

* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920962)
आगंतुक पटल : 144