गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरमधील शांतता प्रक्रियेला अधिक लक्षणीय चालना देण्यासाठी भारत सरकार आणि मणिपूर सरकार यांनी मणिपूरमधील झेडयुएफ या बंडखोर गटासोबत कारवाई समाप्ती करार केला

प्रविष्टि तिथि: 27 DEC 2022 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2022

 

‘बंडखोरी मुक्त आणि समृद्ध ईशान्य प्रदेश’ निर्मितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनानुसार, केंद्र सरकार आणि मणिपूर सरकार यांनी नवी दिल्ली येथे आज झेडयुएफ म्हणजेच झेलियानग्राँग युनायटेड फ्रंट या गटाशी कारवाई समाप्ती बंदी करार केला. हा बंडखोर गट गेल्या एक दशकाहून अधिक काळ मणिपुरमध्ये सक्रीय होता. आज या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि मणिपूर राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच झेडयुएफचे प्रतिनिधी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

आज झालेल्या करारातील अटींची अंमलबजावणी योग्य रीतीने करुन घेण्यासाठी एका संयुक्त निरीक्षक गटाची स्थापना करण्यात आली आहे.  

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1886948) आगंतुक पटल : 308
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Telugu