युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

मीराबाई चानूचे भारतात भव्य स्वागत


सलामीच्याच दिवशी चानूने मिळवलेले पदक हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी : अनुराग ठाकूर

क्रीडा मंत्र्यांनी एका विशेष सोहळ्यात आज संध्याकाळी या ऑलिंपिक पदकविजेतीचा सत्कार केला

Posted On: 26 JUL 2021 9:49PM by PIB Mumbai

महत्वाचे:

टॉप्स या कार्यक्रमाने  खेळाडूंच्या विकासात आणि भारताच्या पदकांच्या अपेक्षांमध्ये  किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे ते मिराबाई चानूच्या या यशाने दाखवून दिले : केंद्रीय क्रीडा मंत्री

सरकारने मला सर्वतोपरी सहाय्य केले त्याशिवाय ऑलिंपिक पदकापर्यंतची माझी वाटचाल शक्य झाली नसती म्हणूनच मी सरकारची आभारी आहे. : मीराबाई चानू

टोकियो ओलंपिकमधील भारताची पहिली पदक विजेती सैखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा आज संध्याकाळी स्वदेशी परतले. त्यांचे भारतात नायकाच्या थाटात  भव्य स्वागत करण्यात आले. क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या घरी आयौजित  विशेष सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारोत्तोलनात महिलांसाठीच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलेल्या मीराबाई चानूने  सामर्थ्य आणि मनाची तयारी यासाठीचे प्रशिक्षक एरॉन होर्शिंग यांच्याकडून  प्रशिक्षण घेण्यासाठी 1 मे रोजी अमेरिकेला प्रयाण केले होते. 

कोविड-19 रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे भारतातून येणाऱ्या लोकांवर अमेरिकेत प्रवासासाठीचे निर्बंध लागू होण्याच्या काही दिवस आगोदर अत्यंत कमी काळात सरकारने चानूला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाण्यास तत्परतेने सहाय्य केले.

 

"माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.  याच क्षणासाठी मी कित्येक वर्षे  प्रशिक्षण घेत होते आणि सर्वांसाठीच भव्य असणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा  मंचावर माझे स्वप्न साकार झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षभारित चानूने दिली.

वर्षानुवर्षे तत्परतेने सहकार्य करणाऱ्या सरकारचे, विशेषतः गेल्यावर्षीच्या तसेच  अलीकडच्या अमेरिका वारीसाठी सहाय्य केल्याबद्दल चानूने सरकारचे आभार मानले.

गेल्यावर्षी माझ्या खांद्याशी संबंधित बाबींसाठी केलेला अमेरिकेचा  दौरा पदकांसाठीच्या माझ्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला.

यासाठी सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी सरकारची आभारी आहे , कारण त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य झाला नसता.  

"टारगेट ऑलिंपिक पोडियम योजनेने (TOPS) माझे करियर तसेच पदकांविषयीच्या  अपेक्षा  उंचावल्या." अशी प्रतिक्रिया मीराबाई चानूने दिली.

 

मीराबाई चानूचे यश हे , टोकियो ऑलिम्पिकच्या पदक सोहळ्यात भारताचा झेंडा फडकावला गेला आणि भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले  तेव्हा अभिमानाने भरून आलेल्या 130 कोटी भारतीयांचे यश आहे, असे उद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन करताना काढले.

 आजवरच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात  भारताने  क्रीडा स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 आपल्या खेळाडूंच्या विकासात आणि परिणामी भारताच्या पदकांच्या अपेक्षा उंचावण्यात या कार्यक्रमाने किती महत्वाची भूमिका भूमिका बजावली आहे हे तिच्या यशाने दाखवून दिले आहे.

खेळाडूंना आपल्यामधील प्रतिभा  विकसित करता येण्यासाठी तसेच त्यांना सर्वोत्तम स्तरावर सर्वोत्कृष्टता प्राप्त करता यावी म्हणून मोदी सरकार प्रत्येक सुविधा पुरवणे सुरूच ठेवेल.' असे त्यांनी स्पष्ट केले.

"तिच्या यशने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. खेळाडूंच्या नवीन पिढीला, विशेषतः ईशान्य भागातील खेळाडूंना ती प्रेरणा देत राहील. " असेही ठाकुर यांनी सांगितले. 

 

केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की टोकियोला जाण्यापूर्वी  झालेल्या आमच्या संभाषणात तिने देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला.

"तिच्या या भव्य यशाने प्रत्येक भारतीयाप्रमाणेच मीही आनंदाने आणि अभिमानाने भरून गेलो आहे.  तिने भारताला मिळवून दिलेला गौरव आणि  मान हा तिच्या वर्षानुवर्षाच्या चिकाटीचे, समर्पणाचे आणि कठोर मेहनतीचे फळ आहे.  आणि तिच्यावर जो प्रशंसेचा वर्षाव होत आहे त्यावर तिचा पुरेपूर  अधिकार आहे" , असेही त्यांनी नमूद केले.

***

MC/Vijaya/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739350) Visitor Counter : 235