शिक्षण मंत्रालय

भारतीय तंत्रविज्ञान संस्थेने विकसित केली, सहज हलवता येणारी तंत्राधारित पारंपारिक पर्यावरणपूरक मोबाईल शवदाहिनी

Posted On: 13 MAY 2021 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

 

भारतीय तंत्रविज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी, रोपर ने जागेवरून हलवता येण्याजोगी विद्युत शवदाहिनी तयार केली आहे. या शवदाहिनीच्या नमुन्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान हे अगदी नवीन असून त्यात लाकडाचा वापर केला असूनही ती धूर विरहीत आहे. एरवी शवदहनासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तुलनेत यात लाकडाचा वापर निम्मा होतो आणि हवेच्या आधारे ज्वलनाचा वापर केल्याने ती पर्यावरणपूरकही आहे.

वातीच्या स्टोव्हचे तंत्रज्ञान यात वापरले आहे. वातीचा स्टोव्ह पेटवल्यावर सुरुवातीला वातींची ज्योत पिवळ्या रंगांची असते. वातींवरील हवेचा वापर करणाऱ्या ज्वलनप्रणालीच्या मदतीने ही ज्वाला धूरविरहीत निळ्या ज्योतींमध्ये रुपांतरीत होते. 

भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचे प्रोफेसर आणि इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी अँड स्पॉन्सर्ड रिसर्च अँड इंडस्ट्री इंटरॅक्शन (ICSR&II) चे डीन  डॉ. हरपाल सिंग यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. ही शवदाहिनी किंवा ज्वलनभट्टी ही 1044 डिग्री सेल्सियस पर्यंत तापत असल्यामुळे संपूर्ण निर्जंतुकीकरणही साधते, असे त्यांनी स्पष्ट केले

या गाडीच्या आकाराच्या शवदाहिनीला चाके असून ती कोठेही सहजगत्या नेता येते. हवेच्या सहाय्याने होणाऱ्या ज्वलनासाठी प्रारंभिक व नंतरच्या टप्प्यात लागणाऱ्या गरम हवेची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. याच शव नष्ट होण्यासाठी 12 तास लागतात. शवदाहिनी थंड होण्यासाठी लागणारा वेळही यात समाविष्ट आहे. सामान्य लाकडी शवदाहिनी थंड होण्यासाठी 48 तासांचा वेळ घेते, असे हरप्रीत सिंग यांनी स्पष्ट केले. लाकडाच्या मर्यादित वापरामुळे कार्बन पदचिन्हे निम्म्याने वाचतात. उष्णतेच्या संचयनावरील दहन नसल्यामुळे याला थंड होण्यासही कमी वेळ लागतो  असेही सिंग यांनी सांगितले. गाडीच्या दोन्ही बाजूला स्टेनलेस स्टीलचे रोधक आवरण असल्यामुळे उष्णता वाया जात नाही व लाकडांचा वापर कमी होतो. या उपकरणाखाली राख जमा करण्यासाठी पात्र आहे.

विद्युत शवदाहिनीच्या नमुन्याचे प्रायोगिक परिक्षण

लाकडाच्या वापरामुळे  आपण तंत्राधारित  पारंपारिक नमुना शवदाहिनीसाठी वापरला असे म्हणता येईल असे त्यांनी सांगितले. लाकडाच्या चितेशी आपल्या श्रद्धा आणि परंपरा जोडलेल्या आहेत ती भावनाही यात जपली जात असल्याचे ते म्हणाले.

महामारीसंबधीत सध्याची परिस्थिती बघता या शवदाहिनी व्यवस्थेचा स्वीकार केल्यास लाकडाचा वापर परवडत नसणाऱ्यांही आपल्या आप्तेष्टांच्या अंत्येष्टीसाठी योग्य व सन्मान्य पर्याय मिळेल असे चिमा बॉयलर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  हरजिंदर चिमा म्हणाले. ही विद्युतदाहिनी सहज हलवण्याजोगी असल्यामुळे संबधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने ती कुठेही नेता येईल. त्यामुळे आता अंत्येष्टीच्या जागी होणारी जागेची अडचण टाळण्यासाठी मदत होईल.

 

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718309) Visitor Counter : 177