संरक्षण मंत्रालय

एअरो इंडिया-2021 बरोबरच हिंद महासागर प्रदेश संरक्षण मंत्र्यांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे

Posted On: 03 FEB 2021 5:54PM by PIB Mumbai

 

भारतात बेंगळुरू येथे 3 ते 5 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार असलेल्या आशियातील सर्वात भव्य एअरो इंडिया 2021 शो दरम्यान 4 फेब्रुवारी,2021 रोजी होणार असणाऱ्या  हिंदी महासागरी प्रदेशातील संरक्षणमंत्र्यांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे असेल.  हिंदी महासागरातील वर्धिष्णू शांतता, सुरक्षा व सहकार्य ही या परिषदेची व्यापक संकल्पना आहे.

18 देशांनी  उपस्थित राहून सहभागी होण्याबद्दल 30 जानेवारी 2021 पर्यंत पुष्टी दिली आहे.

हिंदी महासागर प्रदेशांतील शांतता, स्थैर्य व संपन्नता यांच्या जपणूकीसाठी संस्थात्मक, आर्थिक, व सहकार्याच्या वातावरणात चर्चेला चालना देणे हे या परिषदेमागील उद्दिष्ट आहे.

भौगोलिकदृष्ट्या भारत हिंद महासागराच्या मध्यभागी असून त्याला 7,500 किमीची विस्तिर्ण किनारपट्टी लाभली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

****

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694824) Visitor Counter : 247