माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘भारतामध्ये चित्रपटांचे भवितव्य’ या विषयावर सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी संवाद


ओटीटी मोठ्या पडद्यांवरील आनंदाची अनुभूती निर्माण करू शकत नाहीत- चित्रपट वितरक अक्षय राठी

Posted On: 22 JAN 2021 4:22PM by PIB Mumbai

पणजी, 22 जानेवारी 2021

ओटीटी मंच दाखल झाल्यापासून ओटीटीवर मनोरंजनविषयक सामग्रीची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि ती देखील खूप मोठ्या फायद्याच्या परताव्याच्या बदल्यात होत आहे, विशेषतः कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण खूपच जास्त असल्याचे पटेल यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सीआयआयचे सहअध्यक्ष आणि यूएफओ मुव्हीजचे संयुक्त अध्यक्ष कपिल अग्रवाल यांनी सिंगल स्क्रीन वाचवणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे सांगितले. चित्रपट वितरक आणि प्रदर्शक अक्षय राठी यांनी देखील याबाबत सहमती व्यक्त केली. सिंगल स्क्रीनला वाचवणे गरजेचे आहे यात काही शंकाच नाही, असे ते म्हणाले. सध्या कोणत्याही चित्रपट प्रदर्शकाला उत्पन्न मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘भारतात चित्रपटांचे भवितव्यः संधी आणि आव्हाने’ या विषयावर 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आज एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये रॉय कपूर फिल्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीआयआय माध्यम आणि मनोरंजनविषयक राष्ट्रीय समितीचे सहअध्यक्ष असलेले चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या परिसंवादाचे संचालन केले.

 

ओटीटीवर अपयशाच्या शिक्क्याची भीती नाही

ओटीटीवर प्रत्येक चित्रपट यशस्वी ठरत आहे जी बाब निर्मात्यांना भुरळ घालत आहे. कोणतीही स्पर्धा नाही किंवा चित्रपट पडल्याचा शिक्का बसत नाही, असे शारिक पटेल यांनी सांगितले.

‘ओटीटी मोठ्या पडद्याच्या वलयाशी बरोबरी करू शकत नाहीत’

चित्रपट निर्माते अक्षय राठी यांनी मात्र यावेळी या नव्या डिजिटल मंचामधील त्रुटी अधोरेखित केली. ओटीटी म्हणजे एक सोय आहे पण मनोरंजनाचा खरा अनुभव देऊ शकत नाही. मोठ्या पडद्यावर जो आनंद मिळतो त्या अनुभूतीची बरोबरी ओटीटी करू शकत नाहीत, ही बाब त्यांनी निदर्शनाला आणली.

सिंगल स्क्रीनला कसे वाचवणार?

यूएफओ मुव्हीजचे कपिल अग्रवाल यांनी या प्रश्नावर काही उपाय सुचवले. चित्रपटगृहांमध्ये योग्य प्रकारे ही सामग्री नेणे गरजेचे आहे, महसुलाच्या विभागणीच्या आधारे याची सुरुवात झाली पाहिजे. चित्रपट प्रदर्शन उद्योगाने देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अधिक पारदर्शक झाले पाहिजे, असे अग्रवाल म्हणाले. योग्य दर्शकांसाठी योग्य प्रकारचे मनोरंजन उपलब्ध करण्यावर देखील त्यांनी भर दिला. सिंगल स्क्रीनना उर्जितावस्था देण्यासाठी योग्य मनोरंजन सामग्रीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत विरुद्ध इंडिया?

या सत्राचे मॉडरेटर सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सध्या निर्माण होणाऱ्या मनोरंजनाच्या स्वरुपाबाबत प्रश्न उपस्थित केला. हे स्वरुप ‘भारत’ असे न राहाता ‘इंडिया’ च्या दिशेने झुकू लागले आहे का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691224) Visitor Counter : 164