ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खरीप विपणन हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमतीवरील खरेदी
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2020 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020
सध्या सुरू झालेल्या खरीप विपणन हंगाम (KMS) 2020-21, मध्ये सरकारने गेल्या हंगामाप्रमाणेच अस्तित्वात असलेल्या किमान आधारभूत किंमत योजनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी केली आहे.

या किमान आधारभूत किंमतीवर झालेल्या एकूण 39,740 कोटी रुपयांच्या खरेदीचा लाभ 17.74 लाख शेतकऱ्यांना झाला आहे.


तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगाम 2020-21 मध्ये 45.10 LMT डाळी आणि तेलबियांच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत (PSS) खरेदीला मंजूरी देण्यात आली.


कालपर्यंत सरकारने नोडल एजन्सीजच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत योजनेतून 10,571 मेट्रिक टन मूग, उडीद, भूईमूग आणि सोयाबिनची 57.83 कोटी रूपयांची खरेदी केली. याचा लाभ तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि हरयाणातील 6,607 शेतकऱ्यांना झाला.

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1669603)
आगंतुक पटल : 174