गृह मंत्रालय

भारतीयांची सुरक्षा आणि निरोगी जीवनाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा


कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत नागरिकांचे प्राण वाचविणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे मोदी सरकारचे मत”

“आज राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकल्पाचा पुनरुच्चार केला”

"लस विकसित होईपर्यंत बेपर्वाईने वागू नका” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे अनुसरण करण्याची विनंती मी प्रत्येकाला करतो."

Posted On: 20 OCT 2020 9:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारतीयांची सुरक्षा आणि निरोगी जीवनाला  मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये शाह म्हणाले की, “कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत नागरिकांचे प्राण वाचविणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे मोदी सरकारचे मत आहे. आज राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकल्पाचा पुनरुच्चार केला”.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, "लस विकसित होईपर्यंत बेपर्वाईने वागू नका”  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे मार्गदर्शक मंत्राप्रमाणे पालन करण्याची विनंती मी प्रत्येकाला करतो. ते म्हणाले, “केवळ एक संयुक्त आणि दृढनिश्चयी  भारत या महामारीवर मात करू शकेल”.

भारतवासियों की सुरक्षा और स्वस्थ जीवन ही मोदी सरकार की सर्वोच्च प्राथमिकता रही है। कोरोना के विरुद्ध इस जंग में भी देशवासियों के जीवन को बचाना ही मोदी सरकार ने अपना परम कर्तव्य माना। आज प्रधानमंत्री @narendramodi जी ने राष्ट्र को संबोधित करते हुए इस संकल्प को पुनः दोहराया है।

— Amit Shah (@AmitShah) October 20, 2020

मैं सभी से करबद्ध निवेदन करता हूँ कि इस आपदा से लड़ने में प्रधानमंत्री @narendramodi जी की ’जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ की अपील को अपने जीवन का मंत्र बनायें और स्वयं को व अपने परिजनों को सुरक्षित रखें। एक संयुक्त व संकल्पित भारत के रूप में ही हम इस आपदा से जीत सकते हैं।

— Amit Shah (@AmitShah) October 20, 2020

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666249) Visitor Counter : 135