ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी आधारभूत किंमतीने झालेले व्यवहार

Posted On: 17 OCT 2020 7:20PM by PIB Mumbai

 

खरीप पिकांच्या 2020-21 च्या विपणन हंगामाला प्रारंभ झाला आहे. मागील हंगामाप्रमाणेच यंदाही किमान आधारभूत मूल्यानुसार सरकारने खरीप 2020-21 च्या हंगामामध्ये अन्नधान्याची किमान आधारभूत मूल्य देवून खरेदी व्यवहार सुरू ठेवले आहेत. खोबरे आणि उडीद उत्पादन ज्या राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते, त्या राज्यांमध्ये किमान आधारभूत मूल्यानुसार व्यवहार होत आहेत.

उत्तराखंडसारख्या नवीन राज्यामध्ये खरेदी प्रक्रियेला जोरदार प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंत  म्हणजे दि. 16.10.2020 पर्यंत  76.77 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली आहे. यासाठी 6.69 लाख शेतकरी बांधवांना किमान आधार मूल्यानुसार 14495.22 कोटी रूपये देण्यात आले.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राज्यस्थान या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम-2020 मध्ये 41.67 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार (पीएसएस )करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ यांच्या मागणीनुसार करण्यात येणार आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर अन्नधान्य मागणीचे प्रस्ताव पाठविले तर ते त्वरित मान्य करून त्यांच्यासाठीही डाळी, तेलबिया आणि खोबरे यांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार करण्यात येणार आहे. या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी थेट नोंदणीकृत शेतकरी बांधवांकडून 2020-21च्या अधिसूचित किमान आधारभूत मूल्यानुसार  नियोजित हंगामामध्ये करण्यात येणार आहे. तसेच तिथे जर अन्नधान्याच्या किंमती किमान आधारभूत मूल्यांपेक्षा कमी झाल्या तर राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय नोडल संस्थांकडून नोंदणीकृत शेतक-यांच्या पिकांची खरेदी करण्यात येणार आहे.

दि. 16.10.2020 पर्यंत सरकारने नोडल संस्थांच्यामार्फत 723.79 मेट्रिक टन मूग आणि उडीद यांची किमान आधारभूत मूल्याने खरेदी केली. त्यासाठी 5.21 कोटी रूपये मोजले. याचा तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा मधल्या 681 शेतकरी बांधवांना लाभ झाला. त्याचप्रमाणे 5089 मेट्रिक अन खोबरे खरेदी केले. यासाठी 52.40 कोटी रूपये किमान आधारभूत मूल्यानुसार पैसे देण्यात आले. त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या 3961 शेतक-यांना फायदा झाला.  डाळी आणि तेलबिया यांची ज्याप्रमाणात आवक सुरू आहे, त्याप्रमाणेच राज्यांनीही आवश्यक खरेदी आणि इतर व्यवस्था करण्यास प्रारंभ केला आहे.

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये दि. 1.10.2020 पासून कपाशीच्या खरेदीला प्रारंभ झाला आहे. दि.16.10.2020 पर्यंत कापूस महामंडळाने 150654 गाठी (गासड्या) कापसाच्या खरेदी केल्या आहेत. यासाठी किमान आधारभूत मूल्याने 42555.85 लाख रूपये देण्यात आले. याचा 30139 कापूस उत्पादकांना लाभ झाला.

***

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665531) Visitor Counter : 122