आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोवीड -19 चा मुकाबला करण्यासाठी धोरणात्मक दृष्टीकोन

Posted On: 15 SEP 2020 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

कोवीड -19 च्या पार्श्वभूमीवर भारतात पुढील प्रकारे विशिष्ट परिस्थितीवर आधारित दृष्टिकोन स्वीकारला जाईल, (i) प्रवाससंबंधित भारतात नोंदवला गेलेला रूग्ण (ii) कोवीड -19 चा स्थानिक संसर्ग, (iii) मोठ्या प्रमाणात उद्रेक रोखणे शक्य, (iv) कोवीड -19 चा व्यापक प्रमाणावर सामुदायिक प्रसार आणि (v) कोवीड -19 हा भारतात स्थायी.

सध्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो आटोक्यात ठेवण्यासाठी भारत सरकार धोरणात्मक पावले उचलत आहे.

देशात कोवीड -19 च्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत सरकारने लक्षणीय यश मिळवले आहे. भारतामध्ये दर दहा लाख नागरिकांमागे 3,328 रूग्ण आणि 55 मृत्युंची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जगातील इतर कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोवीड -19 साठी समर्पित रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी विशिष्ट दृष्टीकोन स्वीकारला आहे. मार्च 2020 च्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत विलगीकरणासाठी समर्पित वेगळ्या खाटांची क्षमता 36.3 पट तर आयसीयू खाटांची क्षमता 24.6 पट वाढविण्यात आली आहे. आजघडीला कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कोवीड -19 बाबत वैद्यकीय व्यवस्थापनाविषयीचे दिशानिर्देश वेळोवेळी जारी करण्यात आले, नियमितपणे अद्ययावत करण्यात आले आणि व्यापकपणे प्रसारितही करण्यात आले. योग्य रीहायड्रेशन, पूरक ऑक्सिजन उपचार, सौम्य संसर्ग असणारी परंतु उच्च-जोखीम प्रकरणे तसेच मध्यम जोखमीच्या प्रकरणांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि लक्षणांनुसार उपचार प्रदान करणे, यावर भर देण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ऑक्सिजन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, याची खातरजमा केली आहे. भारतात कोवीड -19 मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जागतिक सरासरीच्या तुलनेत निम्मी आहे.

रूग्णांना लवकरात लवकर कोविड – 19 वरील उपचार सुविधा प्रदान करण्याबरोबरच त्यांच्यावर सातत्याने देखरेख ठेवणे, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणे आणि अशा सर्व प्रकरणांचे योग्य व्यवस्थापन करून कोवीड -19 संसर्गामुळे वाढता मृत्युदर नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Iyengar/M.Pange/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654539) Visitor Counter : 212