गृह मंत्रालय

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकनपत्रे पाठवण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवली

Posted On: 20 AUG 2020 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020

 

देशाच्या एकता आणि अखंडतेत योगदानाबद्दल देण्यात येणारा  सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन प्रक्रियेला आता  31.10.2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या  https://nationalunityawards.mha.gov.in या संकेतस्थळावर  ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने केंद्र सरकारने हा पुरस्कार सुरू केला आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला चालना देण्यासाठी आणि बळकट व अखंड भारताचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी उल्लेखनीय  आणि प्रेरणादायी योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.

पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे -

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001MS4L.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002R6F9.jpg

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647389) Visitor Counter : 102