पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्वाभिमान, धैर्य आणि दृढतेचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 11:00AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मसन्मान, धैर्य आणि सन्मानाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी तडजोड न करता त्यावर ठाम राहण्यातच खरा पराक्रम आणि सामर्थ्य दडले आहे, यावर त्यांनी भर दिला आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित शेअर केले आहे:
“उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम्।
अप्यपर्वणि भज्येत न नमत्वेव कस्यचित्॥”
माणसाने सदैव स्वाभिमान, धैर्य आणि प्रतिष्ठेने जगावे. कोणत्याही परिस्थितीत आपली तत्त्वे आणि मूल्ये यांच्याशी तडजोड न करता, सत्य, संयम आणि स्वाभिमानाने आपल्या आदर्शांवर ठाम राहणे यातच खरे शौर्य आणि सामर्थ्य सामावलेल आहे, असे हे सुभाषित सांगते.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम्।
अप्यपर्वणि भज्येत न नमत्वेव कस्यचित्॥”
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300720)
आगंतुक पटल : 13