पंतप्रधान कार्यालय
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प अधोरेखित करणारा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी म्हटले की, भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करत असताना, या लेखातून माननीय उपराष्ट्रपतींच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्याच्या आठवणींना उजाळा मिळतो. तसेच, अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावे आणि राष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहनही या लेखातून करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले:
“भारत आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले आहे.
या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावे आणि राष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.”
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300097)
आगंतुक पटल : 10