पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2026 7:48AM by PIB Mumbai

धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे - 

“चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।। ”

हे सुभाषित सांगते की, प्रलयकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांच्या तडाख्याने पर्वतही हादरू लागतात, धैर्यवान व्यक्तीचे मन मात्र संकटाच्या काळातही अविचल आणि शांत राहते.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे; 

''धैर्य, ही कुठल्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे. यामुळे कठीण आव्हानांमध्येही देशाला एकजूट राखण्याची आणि प्रगती, समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या दिशेने निरंतर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. 

चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः।

कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः।।”

***

NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2282393) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam