पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आणीबाणीमुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि आकांक्षांवर कसा परिणाम झाला, याविषयीचा लेख पंतप्रधानांकडून सामायिक

Posted On: 25 JUN 2026 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आणीबाणी आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि आकांक्षांवर तिच्या झालेल्या परिणामांविषयी लिहिलेला एक लेख सामायिक केला.

हा लेख ऐतिहासिक जागरूकता वाढवून, सांस्कृतिक स्मृती जतन करून आणि राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ करून 'सेवा पर्व' आणि 'आझादी का अमृत महोत्सव' यांसारखे सरकारी उपक्रम घटनात्मक मूल्यांना कसे बळकट करतात यावर भर देतो, असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी यांनी एक्सवर  पोस्ट केले:

"देश #SamvidhanHatyaDiwas पाळत असताना, केंद्रीय मंत्री @gssjodhpur यांनी आणीबाणी आणि तिचा लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि आकांक्षांवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकला आहे.

ऐतिहासिक जागरूकता वाढवून, सांस्कृतिक स्मृती जतन करून आणि राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ करून सरकारचे 'सेवा पर्व' आणि 'आझादी का अमृत महोत्सव' यांसारखे उपक्रम घटनात्मक मूल्यांना बळकट करतात, यावर त्यांनी भर दिला आहे."

निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2277907) अभ्यागत कक्ष : 44