पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2026 10:51PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.
‘एक्स’ वर सामायिक केलेल्या संदेशांच्या शृंखलेत मोदी लिहितात;
“ज्या नक्षलग्रस्त भागात जायला लोक दिवसा देखील घाबरत असत, तिथे आम्ही राष्ट्र प्रथम भावनेसह विकासाचा निश्चय करून आगेकूच करत आहोत. परिणामी, आज देशात माओवादी दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे.
#RepublicSummit2026”
“सेवाभावाच्या गेल्या 12 वर्षांच्या कालावधीने आम्हाला आणखी एक यश मिळवून दिले आहे – निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आशा-आकांक्षांनी भरलेल्या भारताची उभारणी!
#RepublicSummit2026”
“मध्यमवर्गाला आम्ही नेहमीच खूप प्राधान्य दिले आहे. या वर्गाचे जीवनमान सुलभ होण्यासाठी सरकारने प्रत्येक पातळीवर काम केले आहे.
#RepublicSummit2026”
“म्हणूनच भारताच्या विकासाच्या या महत्त्वाच्या काळात वरकरणी पटतील असे पण खरेतर फोल असलेले युक्तिवाद करणाऱ्यांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे...
#RepublicSummit2026”
***
NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276926)
आगंतुक पटल : 11